चारुशीला -4
ताई… अग ताई स्वरूपा चारुशीलाला (charushila)आवाज देत होती. तिच्या आवाजाने चारुशीला एकदम भानावर आली.
अगं मला का नाही आवाज दिलास कपडे धुवायला यायचं होतं तर. स्वरूपा चारुशीला ला ओरडली. अगं काही नाही थोडीच कपडे होते त्यामुळे मी एकटीच आले. मुलगा आवडलं नाही का तुला?
स्वरूपाने विचारताच चारुशीला म्हटली छान होता कि न आवडायला काय झालं. मग इतकी काय विचारांमध्ये हरवली आहेस. काही नाही ग असच ” असं म्हणून तिने स्वरूपाला टाळलं. तिच्या डोक्यातून मात्र अवंतिका काही जाईना. अवंतिका लहानपणापासून त्या घरात वाढल्यामुळे आणि पवन च्या कायम सानिध्यात राहिल्यामुळे त्याच्यावर प्रेम तर करू शकते. पण पवन चे काय? त्याच्या मनात तर अवंतिका विषयी काहीच नव्हते. काय करावे एकदा भेटून पवनला सर्व सांगावे का? अवंतिकाला भेटून आपले त्याच्यावर प्रेम आहे हे सांगावे. तिला काहीच सुचत नव्हते.
शरद रावांचा काही निरोप यायच्या आधीच हे कोडे सुटायला हवे. इकडे अवंतिका गाडीमध्ये काहीच बोलत नव्हती. सुशीला ताई अवंतिकाला म्हणाल्या, कशी वाटली चारुशीला तुला? तुझी तर मैत्रीणच आहे. पवन तुला आवडली का रे? पवनला विचारताच. गालातल्या गालात हसून तो आवडली की न आवडण्यासारखं काय होतं तिच्यात.
असं म्हणतात सुशीला ताई आणि संपतराव एकमेकांकडे बघून हसू लागले. अवंतिकाला मात्र फारच अवघडल्यासारखे झाले. कधी एकदा घरी जातो असं तिला झालं. मागच्या वर्षी जेव्हा संपत रावांनी अवंतिकासाठी एका मोठ्या घरातले मागणे आणले होते. त्यावेळेस अवंतिका त्यांना म्हटली होती. इतक्या लवकर मी लग्न करणार नाही. त्यानंतर संपत रावांनी परत तिच्या पुढे लग्नाचा विषय काढला नव्हता.
उद्याच आपण शरद रावांकडे निरोप पाठवू असं सुशीला ताईंनी म्हणताच अवंतिका चा चेहरा एकदम पडला. घरी पोहोचताच अवंतिका तिच्या रूममध्ये गेली आणि दरवाजा लावून रूममध्ये एकटीच रडत बसली. पवनला मात्र कळाले होते याची काहीतरी बिनसले आहे.
संपत रावांना आणि सुशीला ताईंना चारुशीला खूपच आवडली होती. सर्वसाधारण कुटुंबातील एक संस्कारी मुलगी दिसायलाही छान होती. पवन ची संमती घेऊन त्यांनी शरदराबाकडून निवृत्ती रावांकडे निरोप धाडायचे ठरवले.” अवंतिका बरी आहेस ना तू? पवन ने अवंतिकाच्या खोलीचा दरवाजा वाजवत विचारले. अतुल काहीच आवाज आला नाही. पवनला वाटले अवंतिका झोपली असेल. म्हणून तो तिथून निघून गेला.
अवंतिका मात्र खिडकीत बसून रडत होती. माझे पवन वर प्रेम आहे हे जर आपण आई-बाबांना सांगितले तर? त्यांना किती मोठा धक्का बसेल. आणि पवन सुद्धा तिच्याकडे एक बहीण म्हणूनच पाहत होता. लहानपणापासून सुशीला ताई आणि संपतराव यांनी आपल्याला इतक्या मायेने सांभाळले. त्याची असे परतफेड करणे योग्य नाही. असे तिला वाटून गेले. खूप विचार केल्यानंतर तिने माघार घ्यायची ठरवली.
आपण चारुशीला याबद्दल सांगायलाच नको पाहिजे होते असे तिला वाटले. आता काही करून तिला चारुशीला ची भेट घ्यायची होती. व काही कारणे देऊन मी सांगितले ते खोटे होते हे सांगायचे होते. दुसऱ्या दिवशी पवन मार्फत तिने शरदरावांचा घरचा नंबर मिळवला. व त्यानंतर चारुशीला च्या घरचा नंबर मिळवला.
हॅलो कोण बोलतंय निवृत्ती रावांनी फोन उचलला. नमस्कार काका मी अवंतिका बोलती चारुशीला ची मैत्रीण चारुशीला आहे का मला थोडं बोलायचं होतं. नमस्कार बाळा कशी आहेस तू? असं म्हणत त्यांनी चारुशिलाला आवाज दिला. चारुशीलाने फोन घेतल्यावर अवंतिकाने तू उद्या मला भेटायला येऊ शकतेस का? असे असे विचारले. आणि चारुशीला ला एकदम हुश्य झाले.
दोघींनी ही ज्या कम्प्युटर क्लासला जात होत्या. त्याच्या जवळच एक मंदिर होते तिथे भेटायचे ठरवले.कालपासून चारुशीलाचे चित्त थार्यावर नव्हते. अवंतिका चा फोन आल्यावर तिला थोडे हायसे वाटले. रात्रभर विचार करून काळजावर दगड ठेवून चारुशीलाने एक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाने तिचे प्रेमाचे संपूर्ण जग हलणार होते…..
Nice
खूप छान…. पुढे काय होणार याची उत्सुकता लागून रहाते… खूप छान लिखाण 🥰🥰