चारुशीला17
पवन मी जरा चार-पाच दिवस आई-बाबांकडे जाऊन येऊ का? चारुशीला(Charushila)ने पवनला विचारले.
“असं अचानक” पवन म्हटला. नाही रे खूप दिवस झाले राहायला गेले नाही म्हणून म्हटलं जाऊन यावे. हो जा कि विचारायचं काय त्यात. नाही रात्री तुझ्यावर कुणीतरी हल्ला केला. आणि आज मी अचानक माहेरी चालले बरे दिसत नाही. अगं काही नाही जाऊन ये तू. बाबांनी अजून दोन गडी बोलावले आहेत बंगल्याच्या देखभालीसाठी तू नको काळजी करूस तु निवांत रहा.
खरंतर चारुशीला चा अजिबात पाय निघत नव्हता. रात्री पवन वर जो हल्ला झाला. त्यानंतर तिला पवन ची काळजी वाटायला लागली होती. परंतु त्यासाठीच ती माहेरी चालली होती. तिच्या डोक्यात काहीतरी चालले होते.
ती संपत रावांच्या खोलीमध्ये आली. आणि पाया पडून म्हणाली. बाबा मी चार-पाच दिवस माहेरी जाऊन येईन म्हणते. अरे बाळा.. ये कि जाऊन तेवढाच तुलाही बदल होईल. जाताना ड्रायव्हर आणि गाडी घेऊन जा. तो तुला सोडून परत येईल.निवृत्ती रावांना मात्र झाल्या प्रकाराबद्दल काही सांगू नको. नाही सांगणार बाबा उगाच त्यांना काळजी कशाला. असं म्हणून चारुशीला किचन मध्ये आली.
सकाळचा नाश्ता तयार झाला होता. अवंतिका काही दिसत नव्हती. रुक्मिणी मावशी अवंतिका चा नाश्ता झाला का? नाही ग चारू ती सकाळपासून किचनमध्ये आलीच नाही. असं म्हणतात चारुशीला अवंतिकाच्या खोलीमध्ये तिला पाहण्यासाठी गेली. ती अजूनही झोपलेली होती.
अवंतिका का ग बरे वाटत नाही का? चारुशीला ने तिच्या कपाळावर हात ठेवत म्हटले. अगं मला रात्री झोपच येत नव्हती म्हणून मी हॉलमध्ये झोपले. आता सकाळी मी खोली मध्ये आले. अजून झोप येतिये. अगं मी माहेरी चालली आहे चार-पाच दिवस तुला माझ्यासोबत यायचे असेल तर चल. नाही ग इथे कोणीतरी लक्ष ठेवायला हवे. तू ये जाऊन मी आहे इथे काळजी करू नकोस.
खरंतर पवनला अवंतिका घरात असताना सोडून जाताना चारुशीला वाईट वाटत होते. परंतु तिला जायचेच होते. पवन कारखान्यात गेल्यानंतर एका छोट्याशा बॅगमध्ये सामान भरून ड्रायव्हर दादांना बरोबर घेऊन निघाली. अवंतिका आणि रुक्मिणी मावशी तिला सोडायला गाडीपर्यंत आल्या. चारुशीला त्या दोघींचेही चेहरे नीट पाहत होती.
तिने ड्रायव्हरला सुद्धा बजावले रात्री झालेला प्रकार माझ्या आई-वडिलांना सांगायचं नाही. गावातून गाडी जाताना तिची नजर वेड्या गोधू मावशींना शोधत होती परंतु ती काही कुठे दिसली नाही.
लांबूनच गाडी दिसल्यावर चारुची बहीण पळतच पुढे आली. “ताई आली ताई आली “ तिच्या आवाजाने आई बाहेर आली.चारू गाडीच्या खाली उतरली आणि बहिणीला मिठी मारली. चारू असं अचानक आलीस ग? चारू आईच्या पाया पडली. अग आई खूप दिवस झाले आले नव्हते म्हणून जा म्हणाले बाबा.बोलत बोलत सगळे घरात आले.
ड्राइवर चा चहा पानी झाला आणि तो निघून गेला.घरचे सगळे बरे आहेत ना ग? आईने विचारले हो ग आई सगळे छान आहेत.बाबा आणि कौस्तुभ कुठे गेले. बाबा जरा बाहेर गेले आहेत कौस्तुभ चि परीक्षा चालू आहे तो शाळेत गेलाय. आईने सांगितले.चारुकडे सुमनताई न्याहाळून पाहत होत्या.लग्न झाल्यावर लगेच सासूबाई गेल्या आणि सगळी जबाबदारी चारुवर पडली. लवकरच पोरगी समजूतदार झाली.
“आई मी आता मस्त झोपणार आहे “ झोप ग बाई आराम कर. माहेरपनाचा आनंद घे. सुमनताई हसून म्हणाल्या.“जानु तूझी परीक्षा झाली ना ग. तुला यायचंय हा माझ्याबरोबर माझ्या सासरी. अग आत्ताच आलीस नां लगेच जायची कसली भाषा करतीयेस. सुमनताई म्हंटल्या.
आई जानुला घेऊन जाण्यासाठीच आले मी. काही दिवस राहील माझ्या बरोबर. चारू घाईघाईने म्हटली.तुझ्या बाबांना विचार बाई? सुमनताई असं म्हटल्यावर चारू तिच्या खोलीत गेली. बेडवर पडताच तिला एकदम गाढ झोप लागली.
संध्याकाळ झाली तशी “ताई ताई उठ “ना कौस्तुभ आवाज द्यायला लागला तसे चारूने डोळे उघडले. थोडा वेळ तर आपण कुठे आहोत हेच तिला कळेना.ताई….कौस्तुभ पळतच आला आणि चारूच्या जवळ येऊन बसला.
काय रे कसा गेला पेपर? सोप्पा होता ताई. असं म्हणून तो चोरून चारुकडे बघत होता. अरे लाजतोयेस काय? चारूने त्याला जवळ ओढले. बाबा आले का रे? हो आले.
सुटलेल्या केसाचा अंबाडा बांधत ती बाहेर आली. निवृती राव सोफ्यावर बसले होते. कसे आहात बाबा? चारू पाया पडत म्हणाली. मी बरा आहे बाळा तू बरी आहेस ना? हो बाबा. चारूने हसत उत्तर दिले.
क्रमश….
😍😍
सुंदर 😘
माहेर ते माहेरच असतं 🥰🥰