चारुशीला 31
“ चारू शांत हो बाळा. संपतराव चारूशीला (Charushila)कडे पाहत म्हणाले. चारू चे संपूर्ण अंग थरथर कापत होते. झालेला प्रकार तिच्या हळूहळू लक्षात येत होता.
पण कमल मावशीने अवंतिका बरोबर असे का केले हे तिला समजत नव्हते. कारण अवंतिका तर तिच्या सख्ख्या बहिणीची मुलगी होती. संपतराव तिथून अवंतिकाला पाहण्यासाठी तिच्या खोलीत गेले. अवंतिका अजूनही रडत होती. अवंतिका काय प्रकार आहे हा सगळा? संपतराव अवंतिका कडे पाहून म्हणाले. अवंतिका काहीही न बोलता खाली मान घालून बसली.
तेवढ्यात पवन चारुशीला घेऊन तिच्या खोलीत आला. जानू सुद्धा मागोमाग आली. “अवंतिका सगळं खरं खरं सांगून टाक. पवनला आणि बाबानां.”चारुशीला अवंतिका कडे पाहत म्हणाली.
“बाबा कमल मावशी चारुशीला ला घराच्या बाहेर काढण्यासाठी अघोरी मार्गाचा उपयोग करत होती. तिने मला चारुशीला च्या जेवणात कसली तरी राख मिसळायला लागली होती. मी ते करण्यास तिला नकार दिल्यानंतर ती माझ्यावर चिडली आणि तिने मला तळखोलीत बांधून ठेवले. अवंतिका रडत रडत सांगू लागली.
“चारुशीलाने कमलचे काय वाईट केले आहे ” बाबा एकदम बोलले. कमल ह्या थराला जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. संपतराव डोक्याला हात लावून म्हणाले. बाबा खूप रात्र झाली आहे तुम्ही जाऊन झोपा. आपण सकाळी बोलू. असं म्हणून पवनने संपत रावांनां आधार देत त्यांना त्यांच्या खोलीत नेले.
पवन तू हो पुढं मी येते असं म्हणून चारुशीला अवंतिकाच्या खोलीतच बसली. जानू सुद्धा तिथेच होती. “बोल अवंतिका चारूने अवंतिका चा हात धरून विचारले. चारू मी आत्ताच बाबांना सांगितले तेच खरे आहे.” चारुशीला केविलवाणे तोंड करून म्हणाली.
“हो ते खरे असेलही परंतु संपूर्ण सत्य नाही हे मला माहित आहे अवंतिका. मला सगळे पहिल्यापासून ऐकायचे आहे. चारुशीला अवंतिकाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली.
“चारू लहानपणापासून कमल मावशीने मला पवन बरोबरच लग्न करायचे आहे हे डोक्यात घालून दिले होते. तसे झाले तरच तू सुखात राहशील आणि त्याचा फायदा मावशीलाही होईल हे तिला ठाऊक होते. मी पवन कडे कारण त्याच दृष्टीने पाहत आले आहे. पण मध्येच पवन चे आणि तुझे लग्न झाले. तेव्हा मात्र कमल मावशी ने मला खूप धारेवर धरले. तुमचे लग्न झाल्यापासून तिचे आघोरी मार्ग चालू झाले.” चारुशीला कान देऊन ऐकत होती.
“कमल मावशीला काही करून तुला या घरातून हाकलून द्यायचे होते. त्यामुळे तिने रात्री बागेत बसून तुला घाबरवणे आईवर हल्ला करणे इतकेच काय बंगल्यासमोरच्या पडक्या घरात बसून ती तुझ्यावर नजर ठेवत होती. आणि तिथून ती तळ खोलीतून माझ्या खोलीत यायची अवंतिका बोलत असताना जानूला मात्र घामच फुटला.
” हे सगळे मी खरे मानले तरी अवंतिका तू तिला मदत केलीच ना? चारुशीला ने अवंतिकाचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाली. चारू मला सुरुवातीला कमल मावशी जे म्हणत होती ते सर्व पटत होते. परंतु नंतर तिने आघोरी मार्ग चालू केला. मी तिला नकार द्यायची तेव्हा ती मला काळ्या बाहुल्यांची भीती घालायची.
माझ्या खोलीमध्ये येऊन घमेल्यात लाकडे पेटवून ती बरेचसे काहीतरी मंत्र पुटपुटत बसायची. नंतर नंतर मला खूपच भीती वाटायला लागली. आणि मी तिला हे सर्व करू नको असे सांगितले. सकाळी ति मला भेटण्याची निमित्त करून बंगल्यात आली आणि मला तुझ्या जेवणात घालण्यासाठी कसली तरी राख दिली.
पण माझी हिम्मत झाली नाही की तुझ्या जेवणात ती राख घालावी. हे जेव्हा कमल मावशीला कळले तेव्हा ती माझ्यावर खूप रागवली. तिने मला ओढत तर खोलीत नेले आणि तिथे खाटेवर बांधून ठेवले. जर तुला ही संपत्ती मिळवता येत नसेल तर तुझा तरी काय जगून फायदा असं म्हणून तिने मला अघोरी मार्गाने मारण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत तुम्ही आलात. परत जाण्यासाठी जेव्हा ती दुसरा दरवाजा उघडायला गेली की जो दरवाजा बंगल्यासमोरच्या पडक्या घरात उघडतो. तो दरवाजा काही केल्या तिला उघडेना. ती परत खोलीत आली आणि तिथेच एका कोपऱ्यात लपून बसली.
चारुशीला हे सगळे ऐकून एकदम सुन्न झाली जानूला तर काय बोलावे हेच सुचेना. “चारू मला माफ कर तुझ्यावर कोणतेही संकट येईल किंवा तुझ्या जीवाचे काही बरे वाईट होईल याचा मी कधी विचार सुद्धा केला नाही. कमल मावशीच्या नादी लागून मी तुझ्याबद्दल वाईट विचार केला हे मात्र खरे आहे. त्यासाठी तु मला देशील ती शिक्षा मला मान्य आहे पण प्लीज हे पवनला आणि बाबांना सांगू नकोस. त्या दोघांच्याही मनातून मी जर उतरले तर माझ्या जगण्यात काहीच अर्थ नाही. अवंतिका चारुशीला चा हात हातात घेऊन विनंती करत होती.
अवंतिका तू मला पाहायला आलीस त्यावेळेस थोडंसं बोलली होतीस. पण त्याच वेळेस तू जर खरे तुझ्या मनातले सर्व सांगितले असते तर प्रश्न तिथेच मिटला असता. मी पवन बरोबर लग्न केलं नसतं.
झालं ते झालं अवंतिका इथून पुढे तू माझ्याविषयी मनात काही ठेवू नकोस मीही तुला माफ केले आहे. पवन आणि बाबा तुझ्या लग्नाचे पहात आहेत. चारू समजुतीच्या सुरात बोलली.
“मला कल्पना आहे चारू समीर विषय बोलत आहेस ना तू पवन ला आणि बाबांना सांग की मला पसंत आहे समीर. शक्य तितक्या लवकर माझे लग्न करून द्या म्हणजे मी या घरातून निघून जाईल कारण तुझ्यासमोर येताना प्रत्येक वेळेस मला अपराध्यासारखे वाटणार आहे.” अवंतिका रडत रडत बोलत होती.
अवंतिका मी तुला माफ केले आहे असे म्हटले आहे आणि मी खरंच मनापासून बोलत आहे. तुझ्याकडून चूक झाली बरोबर आहे परंतु त्याचा तुला पश्चाताप होत आहे याचा मला आनंद वाटत आहे. तु निश्चिंत रहा मी किंवा जानू हे कोणालाही बोलणार नाही. “असे म्हणून चारूने अवंतिकाला मिठी मारली.
चारूला खूप मोकळे मोकळे वाटत होते. चल तू जेवून घे असं म्हणून अवंतिकाला घेऊन ती किचनमध्ये गेली आणि तिला जेऊ घातले. जानूला तिने अवंतिका बरोबर तिच्या खोलीत झोपायला सांगितले. चारू तिच्या खोलीमध्ये आली. पवन एकदम शांत गाढ झोपला होता. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. लग्न झाल्यापासून काही ना काही चालूच होते. तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. पवन ने सुद्धा झोपेतच स्मित हास्य केले. चारूच्या दृष्टीने एक प्रकरण मिटले होते. परंतु अजून एक कोडे सोडवायचे बाकी होते.
क्रमश…..
गोधूमावशीचं कोडं बाकी आहे अजून…..