चारुशीला 33|Charushila

चारुशीला 33

“काय झालं ताई? जानू ने चारूशिलाला (Charushila)विचारले. जानू अगं गोधू मावशींचा मृत्यू झाला. काय?जानूला सुद्धा धक्का बसला. हो त्यांना हार्ट अटॅक आला असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जानूला आता काय बोलावे तेच कळेना. जानू तू अवंतिका ला जाऊन सांग उद्या समीर येणार होता तो पुढच्या आठवड्यात येणार आहे.

हो ताई सांगते असे म्हणून जानू अवंतिकाच्या खोलीत गेली. थोड्याच वेळात पवन आला आणि चारूला घेऊन तो गोधू मावशीच्या अंतिम संस्काराला गेला.गोधू मावशींनां त्यांच्याच गावात अंतिम संस्कार साठी आणण्यात आले होते. जास्त नातेवाईक नसल्यामुळे दहा-पंधरा लोकच होती फक्त.

समीरची आई चारू जवळ आली. आणि एक बंद कागदाचे पाकीट चारूच्या हातात दिले. चारू गोधू मावशीच्या खोलीत हा लखोटा सापडला. त्यावरती तुझे नाव लिहिलेले होते. म्हणून मला वाटलं कदाचित गोधू मावशींनी हे तुझ्यासाठी ठेवलेले असावे. माझ्याजवळ गोधू मावशी नेहमी तुझे खूप कौतुक करत असत. चारुशीला माझ्या मुलीसारखे आहे असे त्या मला नेहमी सांगत होत्या. चारुशीला ला आता खूपच रडायला आली.

अचानक ओळख झालेल्या गोधमावशींबरोबर तिचे एक वेगळेच नाते तयार झाले होते. चारुशीला चा संसार सावरायला गोधू मावशींनी खूप मदत केली होती. प्रसंगी चारूचा जीवही गोधू मावशी मुळे वाचला होता. पवन ने गोधू मावशीच्या चितेला अग्नी दिला. आणि जड अंतकरणाने चारू आणि पवन परत घरी आले.

घरी आल्यानंतर चारूने तिच्या खोलीत जाऊन तो बंद लखोटा उघडला. आत मध्ये वहीच्या पानाची एक चिठ्ठी होती. आणि एक छोटीशी गणपतीची मूर्ती.

“प्रिय चारू आज दुपारपासूनच छातीत एकदम कळ आल्याल्यासारखे होत आहे. माझी जायची वेळ झाली आहे हे मला कळून चुकले आहे. तू मला जे वचन दिले होते संपत रावांना शिक्षा देण्याचि त्या वचना मधून मी तुला मुक्त करत आहे. मी संपत रावांना पूर्णपणे माफ केले आहे. माणसाकडून चुका होतात.

माझे लग्न झाल्यापासून फक्त एक दोन वर्ष आम्ही नवरा बायको खूप आनंदात राहिलो. त्यानंतर आमच्या आनंदावर पूर्णपणे विरजण पडले आणि तरुणपणीच मी विधवा झाले. कदाचित माझे गेल्या जन्मीचे काही पाप असेल. त्यामुळे मला ते सर्व भोगावे लागले. चारू तू माझ्या मुलीसारखी आहेस. गावात असलेला वाडा मी तुझ्याकडे सोपवत आहे तो विकून ते पैसे तू अनाथ मुलांच्या वर खर्च करशील असा माझा विश्वास आहे.संपत रावांविषयी मनात कोणतेही किल्मिश ठेवू नकोस. सुखाने संसार कर. तुझीच गोधू मावशी.

चारू एकदम रडायला लागली. कोण कुठली गोधू मावशी ना गोत्याची ना रक्ताची आपल्याला मुलगी मानते आणि आपल्यावर एवढा मोठा विश्वास ठेवते. पवन खोलीमध्ये येताच पवनला मिठी मारून चारुशीला रडायला लागली.

पवन चारुशीलाच्या पाठीवर थापटत म्हणाला “चारू त्या चिठ्ठीत काय लिहिले आहे मी तुला विचारणार नाही कारण तो गोधू मावशीचा आणि तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. तुला सांगावेसे वाटले तर नक्की सांग मी तुला आग्रह करणार नाही.” तू जेवून घे मी कारखान्यात जातो असे म्हणून पवन निघून गेला.

जानू आणि अवंतिका चारूच्या खोलीमध्ये आल्या आणि चारूचा हात पकडून तिला शांत करू लागल्या. तुम्ही दोघी जेवायला जा मी येतेच असे म्हणून चारुने त्यांना बाहेर पाठवले. गोधू मावशीने दिलेली चिठ्ठी तिने कपाटामध्ये अगदी तळाच्या कप्प्यात ठेवून दिले आणि गणपतीची असलेली छोटी मूर्ती तिने टेबलवर पुस्तकांच्या समोर ठेवली.

हात जोडून म्हणाली गणपती बाप्पा तूच मला खूप मोठ्या पेचातून सोडवले आहेस. माझ्यावर अशीच कृपादृष्टी सदैव राहू दे. ती बाहेर आली आणि देवघरात जाऊन डोक्यावर पदर घेत सुशीलाताईंच्या फोटोला नमस्कार केला. आणि सज्ज झाली एका आदर्श सुनेची कर्तव्य पार पाडायला.

समाप्त.

2 thoughts on “चारुशीला 33|Charushila”

Leave a Comment