चारुशीला 27
“चारू कुठ गेलतीस इतक्या रात्री “पवनने चारुशीलाला (Charushila)विचारले. पवन तुला सांगितले तर विश्वास बसणार नाही. अरे अवंतिका कुठलातरी अघोरी मार्ग करत आहे घरात.”
चारुशीलाने खिडकीतून पाहिलेले सगळे पवनला सांगितले. पवन सुद्धा एकदम आश्चर्यचकित झाला. चल आपण पाहून येऊया. “नको नको मगाशीच काढ्याचे निमित्त सांगून तिच्याकडे गेले होते. आता परत गेलो तर तिला संशय येईल.चारुशीला म्हटली. “अग पण हे कुठेतरी थांबायला हवं हे सगळं करून ती काय साध्य करणार आहे.” पवन काळजीच्या स्वरात म्हणाला.
“पवन मी उदया गोधुमावशीला भेटायला जाणार आहे. तेव्हा सुटतील बरीच कोडी.”चारुशीला पवनकडे पाहत म्हणाली. आता हे कधी ठरलं? अरे मगाशी समीरकडे त्या भेटल्या होत्या तेव्हा मी त्यांना विनंती केली.“हे बघ चारू हे प्रकरण खूप लांबत चालले आहे. आता याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे.”पवन म्हटला.मला उद्या जाऊन तर येऊ दे पवन मग आपण बोलू. चारू विनवणी च्या स्वरात म्हणाली तसा पवन उठला आणि कपाटातून छोटा बॉक्स काढून चारूच्या हातावर ठेवला.
“काय आहे यात? चारूने विचारले. “मोबाईल दुपारीच आणला होता पण आपण घाईघाईने पूजेला गेलो. त्यात सिम कार्ड टाकले आहे आणि चालू केलेला आहे” पवन म्हंटला. अरे कशाला मला काही गरज नव्हती आपल्या घरात फोन होता. असू दे ग अडीअडचणीच्या काळात उपयोग होईल. तू उद्या मंदिरात जाशील तेव्हा फोन घेऊन जा”
“चारू आई गेली तेव्हापासून मला खूप भीती वाटायला लागली आहे. तू मात्र नेहमी तुझी काळजी घे. आता यापुढे काही अघटित झालेले आपल्याला परवडणार नाही. पवन एकदम भावूक होत म्हणाला. “काहीही होणार नाही तू नको काळजी करूस मी आहे ना. चारू पवन चा हात हातात घेऊन म्हणाली.” “झोप आता खूप रात्र झाली आहे. तू झोप मी अजून थोडा वेळ पुस्तक वाचन वाचेन. असं म्हणून पवन पुस्तक वाचत बसला.
चारू सकाळी लवकर उठली. तिने जानूलाही उठवले आणि दोघींनी. मिळून रुक्मिणी मावशीला किचनमध्ये मदत केली. त्यामुळे सकाळचे काम पटकन उरकले. पवन आणि संपतराव दोघेही नाश्ता करून कारखान्यात निघून गेले. “मावशी मी जानूला मंदिर दाखवून आणते. असं म्हणून चारू आणि जानू दोघीही ड्रायव्हरला घेऊन मंदिरात गेल्या.
“ ताई खूप सुंदर मंदिर आहे ग हे. मंदिर जानूला खूपच आवडले. दोघी मंदिराच्या पायऱ्या चढून वरती आल्या. देवीच्या पाया पडून त्या मंदिरामागे गोधु मावशीला बघण्यासाठी गेल्या. गोधु मावशी तिथे वाटच पाहत होती. जानूला पाहून ती म्हटली ही कोण? “मावशी ही माझी छोटी बहीण आहे जान्हवी नाव आहे हिचे. चारूने ओळख करून दिली. तिला सगळे माहित आहे तुम्ही निसंकोच पणे पणे बोला. असे म्हणून चारू आणि जानवी दोघीजणी गोधू मावशीच्या शेजारी बसल्या. गोधू मावशींनी बोलायला सुरुवात केली.
“चारू माझा नवराम्हणजेच बबनराब संपत रावांच्या कारखान्यात त्यांच्या हाताखाली हिशोब सांभाळायला होते.खूप हुशार आणि प्रामाणिक होते.आमचेही त्यावेळेस नवीनच लग्न झाले होते. आमचाही गावात खूप मोठा वाडा आहे. शिक्षण चांगले झाल्यामुळे आणि संपत रावांचे शाळेतले चांगले मित्र असल्यामुळे संपतरावाच्या ओळखीने त्यांना त्यांच्याच कारखान्यात नोकरी दिली.
आमचे लग्न झाल्यानंतर वर्षांनी संपत रावांचे लग्न झाले. संपत रावांच्या हातून कारखान्यांमध्ये हिशोबात काहीतरी गडबड झाली. आणि त्याचे सगळे खापर त्यांनी बबनरावांवर फोडले. त्यांनी मला घरी येऊन सगळे सांगितले होते. बबनराव पैशांच्या बाबतीत कधीच चुकू शकत नाही याची मला खात्री होती. जवळजवळ महिनाभर ते घरी आले की नुसते भिंतीकडे पाहत बसायचे. त्यांनी खाणे-पिने सोडले कारखान्यावर जायची सोडले. आमचा सुरू असलेला सोन्यासारखा संसार क्षणात कोसळून गेला.
पुढे पोलीस चौकशा झाल्या. वर्तमानपत्रातही खूप सार्या बातम्या छापून आल्या.कारखान्यातील सर्व लोकांना संपत रावांनी विश्वासात घेऊन बबनरावांविरुद्ध कोर्टामध्ये साक्ष द्यायला लावली आणि बबनराव तुरुंगात गेले. तेव्हा नुकताच पवन चा जन्म झाला होता. मी संपत रावांपुढे पदर पसरला. भीक मागितली.
सुशीला ताईंकडे सुद्धा खूप वेळा मदत मागितली. संपत रावांनी बनरावांना लवकर सोडून आणि असे मला वचन दिले. केस जवळजवळ दोन-तीन वर्ष चालली. तुरुंगातले वातावरण बबनरावांना काही मानवले नाही. तिथेच ते आजारी पडले आणि गेले. एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये नाही माझ्या पदरी पोर नाही मला सासू-सासरे संपूर्ण वाडा मला खायला उठत होता. गावातली सगळे लोक मला आरोपी ची बायको म्हणून पाहत होते.
माझ्यासाठी सगळे संपल्यातच जमा होते. दहा पंधरा वर्षे मी माझ्या माहेरी राहिले. तिथेही भाऊ भाऊजई यांची नेहमी भांडणे होत असे. शेवटी कंटाळून मी परत आले. वाड्यात बबनरावांची आठवण नको म्हणून. गावाबाहेर झोपडी बनवून राहायला लागले. बऱ्याच वेळा मरणाचे विचार डोक्यात आले. पण मी पण म्हटलं संपत रावांना धुळीला मिळवल्याशिवाय मी मरणार नाही.
मग मी वेड्याचे सोंग घेतले. संपत रावांच्या बंगल्याच्या आसपास मी कायमच येत असे. हळूहळू अवंतिकाशी ओळख वाढवली. मला कळून चुकले होते अवंतिका पवन च्या प्रेमात आहे. अवंतिका सुद्धा मला वेडी समजून भाकर आणि भाजी देत होती. त्यानंतर पवन चे लग्न झाले. तुमच्या दोघांची वरात त्या दिवशी गावातून जाताना मी पाहिली. तुला पहिल्यांदा त्या दिवशी मी पाहिले आणि तुझी आणि माझी काहीतरी नाते असावे असे मला एकदम वाटून गेले.
चारू सगळ जीव लावून ऐकत होती. हे सगळं एकदम तिला टीव्हीवरच्या मालिका सारखे वाटत होते. आपले सासरे असे सुद्धा वागू शकतात यावर तिचा विश्वास बसत नव्हता.“मग गोधू मावशी काल अवंतिका बरोबर तिच्या खोलीत तुम्ही होतात का?” चारून विचारले.“नाही “गोधू मावशीने उत्तर दिले.
क्रमश….
👌👌👌